लॉकडाउन असताना विनाकारण रस्त्यावर फिरणारी उस्मानाबाद जिल्ह्यात 58 वाहने जप्त.”
सा . पुज्य नगरी Live ( दि २६ )
उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 25.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 7, तामलवाडी- 1, तुळजापूर- 16, कळंब- 11, परंडा- 8, शहर वाहतुक शाखा- 15, अशी एकुण 58 वाहने ताब्यात घेतली आहेत.
Comments
Post a Comment