ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही _ राजाभाऊ शेळके
पुज्य नगरी न्यूज परंडा ( दि २० )
ग्राम पंचायत निवडणूकीत ग्रामस्थांनी विश्वास ठेऊन विकासाला मत दिले असुन ग्रामस्थांच्या विकासाला तडा जाऊ दिला जानार नाही १ वर्षात गावाचा काया पालट करू अशी ग्वाही कात्राबाद चे राजाभाऊ शेळके यांनी बोलताना दिली .
परंडा तालूक्यातील कात्राबाद , सोनगीरी ग्रुप ग्रामपंचयत मध्ये राजाभाऊ शेळके गटाने ७ पैकी ५ जागेवर विजय मिळवीला असुन दि २० रोजी अधार संस्थेच्या वतीने नुतन ग्रा.प सदस्यांचा कात्राबाद येथे सत्कार करण्यात आला .
या वेळी अधार संस्थेचे अध्यक्ष जुल्फीकार काझी , माजी सरपंच दादा गरड , नवनाथ जगताप , खुर्शिदअली काझी , दत्तू धनवे , गोकुळ गरड , देवकर , इरशाद पटेल , रामचंद्र जाधव , दरीबा शिंदे , विष्णू गरड , रणजीत गरड , प्रविण गरड आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्य गणेश कोकाटे , श्रीमती नीलावती गरड , श्रीमती लक्ष्मी कोळी , परवेज पटेल, श्रीमती मंगल शेळके
यांचा सत्कार करण्यात आला .
कात्राबाद येथील चुरशीच्या लढती कडे संपुर्ण तालूक्याचे लक्ष लागले होते या अती तटीच्या लढतीत राजाभाऊ शेळके पॅनल ने गेल्या २० वर्षाची सत्ता उलथून टाकली असुन ५ जागेवर विजय मिळवीला आहे .
या सत्कार समारंभा वेळी विश्वास बोराडे , कालीदास गरड , शिवाजी काळे , पप्पू गरड ,ईलीयास पटेल , अनिल गरड , सतीश शेळके , नितीन शेळके , सौदागर गरड , लक्ष्मण गरड, विष्णू वेताळ , नवनाथ शेळके , युवराज गरड यांच्या सह सोनगीरी येथील वेताळ व कात्राबाद येथील कार्यकर्त्य ,ग्रामस्थ व महिला मोठया संखेने उपस्थित होत्या
Comments
Post a Comment