वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचावयात्रा चे येरमाळ्यात भव्य स्वागत
काढण्यात आलेली आरक्षण बचाव
यात्रा येरमाळ्यातून मार्गस्थ
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
येरमाळा,दि. २९ (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केलेली आरक्षण बचाव यात्रा काल रविवार रोजी सायंकाळी आठ वाजता भूम कडून धाराशिव कडे जात असताना येरमाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दाखल झाली या यात्रेच्या स्वागतासाठी येरमाळा परिसरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
आरक्षण बचाव यात्रा येरमाळ्या मध्ये दाखल होताच फटाक्याच्या आतिष बाजीने स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी या आरक्षणामुळे ओबीसी व मराठा समाजात अंतर पडले असून हे दोन्ही समाज एकमेकाला पाण्यात बघत आहेत या दोन समाजात ही सामाजिक दरी वाढू नये दोन्ही समाजाचा सामाजिक सलोखा टिकावा यासाठी गावातील सर्वांनी पुढाकार घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचे काम करावे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले व या आरक्षण बचाव यात्रेची सांगता ७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार असून तेथे समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
Comments
Post a Comment